ताज्या बातम्या

अजब सोयगाव तालुका तहसीलचा गजब कारभार या प्रकरणी तहसीलदार मॅडम मा: मनीषा जोगदंड सोयगाव यांना दूरध्वनी द्वारे विचारपूस केली असता सदर प्रकरणी मी स्वतः चौकशी करून तक्रारदार यांचं म्हणणं ऐकून योग्य ती कार्यवाही व योग्य निर्णय संबंधितांना दिला जाईल तसेच दोशींवर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले


जिल्हा संभाजीनगर तालुका सोयगाव येथील पहूरी शिवारात शेतजमीन क्रमांक 8 शेतामध्ये या दोन्ही शेतकऱ्यांची 25 /25 गुंठे जमीन आहे त्या जमिनीतून बेकायदेशीर रस्ता दिल्यामुळे महसूल विभागाचा अजब प्रकार मंडळ अधिकारी लक्ष्मण जाधव व तलाठी शंकर देवतुले यांनी कायद्याचे उल्लंघन करून जमीन संपादित असताना सुद्धा रस्ता दिल्यामुळे पहुंरी येथील शेतकरी राजाराम जंजाळ व उत्तमराव जंजाळ यांच्या शेतीतून रस्ता नसताना रस्ता दिला आणि तोही संपादित क्षेत्राला रस्ता दिल्यामुळे ही बाब शासनाच्या व तहसीलदार कार्यालय सोयगाव यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी कोणतीही एक कार्यवाही केली नाही उडवा उडवी चे उत्तर दिले त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा दिनांक 16 /6/2025 रोजी तहसील कार्यालय सोयगाव येथे आमरण उपोषणाला बसणार आहे तरी शासनाने तत्काळ दाखल घेऊन मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कार्यवाही करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे व झालेली चूक रद्द करण्यात यावी यानंतर सहमती रस्त्याचा अवलंब न करणे मंडळ अधिकारी यांना प्रकरण माहिती असून सुद्धा ही केस दिवाणी न्याय प्रविष्ट असल्यामुळे नायब तहसीलदार सुरे यांनी त्यानंतर पत्र मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिले त्या अर्जाच्या नुसार स्थगिती दिल्यानंतर तात्पुरते स्वरूपाचा रस्त्याचा निर्णय दिला याचा अर्थ असा होतो की नायब तहसीलदार सुरे यांनी दोन्ही बाजूला तबला ठोकला ही माहिती लपवून ठेवणे ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून संपादित जमिनीला रस्ता देणे संविधान विरोधी कार्यवाही आहे अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना माहिती न देणे गैरअर्जदार यांना नोटीस न देणे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून संपादित शेत जमीन बेकायदेशीर खरेदी करून ती नावावर लावणे एक अजब प्रकार सोयगाव तहसील कार्यालयात झाला ही बाब लक्षात आली नसती परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून विनापरवाना शेत रस्ता दिला तोही संपादित जमिनीसाठी त्यामुळे वरील दोन्ही शेतकऱ्यांनी संपूर्ण माहिती कागदपत्रासह प्रत्येक कार्यालयात जाऊन दिली त्यानंतर लघु सिंचन विभाग सिल्लोड यांच्या ऑफिस मध्ये जाऊन इरिगेशन अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती दिली त्यानुसार इरिगेशनचे अधिकारी प्रसाद ठाकरे पाटील यांनी तहसील कार्यालय यांना तीन वेळेस पत्र व्यवहार केला परंतु सोयगाव नायब तहसीलदार सुरे यांनी या अर्जांची दखल घेतली नाही तहसीलदार अधिकारी यांनी तलाठी यांना 2 संचयिका सातबारावर नोंद घेण्यासाठी 1/ते 88 पानांचे मोठी संचयिका काढून तलाठी यांना दिली तलाठी यांनी आज पाहतो काही एक दखल घेतली नाही त्यामुळे वरील नमूद केलेल्या अर्जात दोन्ही शेतकरी आमरण उपोषणाला बसणार आहे याची दखल शासनाने घ्यावी यांच्या जीवितास धोका झाल्यास संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button