ताज्या बातम्या

राज्यात अनेक ठिकाणी हप्ते खोरी वाढली तर लातूरमध्ये तांबाळा सट्टा मटका जुगार क्लबवर आता पोलिसांच्या ऐवजी चोरांचा शस्त्रधारी दरोडा कायदा व सुव्यवस्थेचे धीडवडे करोडो रुपयांच्या हप्ते खोरीमुळे जनतेचा जीव धोक्यात सरकारी पगार असून दोन नंबर धंदे कशासाठी पाहिजे? लातूरचे एसपी सो अमोल तांबे कार्यवाही करतील का?


क्लब मध्ये सुरू असलेल्या सट्टा मटका जुगार अड्ड्यावर चोरांच्या शस्त्रधारी दरोड्याने कायद्याचे लक्तरे वेशीवर कार्यक्रम जनतेला समोर दिसत आहे दिनांक 27/ 3/ 2026 सोमवारी रात्री सट्टा मटका जुगार अड्ड्यावर दरोडा पडल्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले पोलीस अधिकारी प्रशासनाचा कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले पोलिसांना समोर दिसत असलेले सट्टा मट्टा जुगार अड्डे संशयास्पद असून पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा आरोप जनता करीत आहे हप्ते खोरी मुळेच कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली चोर सोडून संन्याशाला फाशी अशी परिस्थिती सध्या राज्यात सुरू असून गृहमंत्री लक्ष देतील का अशी नागरिकांकडून मागणी होत आहे यामध्ये सर्वात गंभीर बाब म्हणजे सट्टा मटका जुगार यांना परवाना सरकारनेही दिला आहे का? प्रत्यक्षात गव्हर्मेंट ला सुट्टी असते पण सट्टा मटका जुगार यांना कधीही सुट्टी राहत नाही 24 तास अवेलेबल बाहेरगाहून येणाऱ्या लोकांची तोबा गर्दी यांची नोंद केली जाते का ते येताना किती पैसे आणतात आणि जाताना संपूर्ण पैसे हरतात जाताना त्यांच्याजवळ पेट्रोलला पैसे सुद्धा शिल्लक राहत नाही काही तर मोटरसायकली क्लब मध्ये बसलेले काही श्रीमंत पैसे वाटणारे यांच्याजवळ गहाण ठेवतात अशी माहिती जनतेकडून मिळाली या प्रकरणाची चौकशी होतच नाही आतापर्यंत झालेल्या कार्यवाही या संशयास्पद असून याकडे गृहमंत्री लक्ष देतील का? स्थानिक रहिवाशांच्या मते क्लब मध्ये रोज मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती क्लब मध्ये पैशावरून बाचाबाची झाल्यानंतर त्याचे रूपांतर खून खराब्यात होते म्हणजेच संविधानात लिहिलेले नियम यांचे उल्लंघन करून सट्टा मटका पत्ता जुगार हे बेकायदेशीर सुरू आहे यामुळे आता पोलीस खाते नियंत्रण ठेवणे ऐवजी चोरी करणारे दरोडेखोर हे दरोडा टाकून यशस्वी होत आहे यादरम्यान सशस्त्र दरोडा पडल्यानंतर पोलीस नेहमीप्रमाणे चौकशीच्या आश्वासन देतात पण अशा गोष्टींची वास्तविक चौकशीच होत नाही पण एखादा गरीब चोरी करणारा नसला तरी त्याला बळजबरी कबलविले जाते काही जणांच्या तर एफ आर आय दाखल सुद्धा करून घेत नाही याप्रकरणी सखोल चौकशी लातूरचे एसपी सो अमोल तांबे यांनी करावी अशी नागरिकांची मागणी होत आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button