ताज्या बातम्या

15 हजाराचे शिक्षण गेले अडीच लाखावर गरिबांनी शिक्षण घ्यावे का नाही सरकारी शाळा बंद आमदार खासदार आणि नेते त्यांचे नातेवाईक यांच्याकडे शाळेचे वर्चस्व शिक्षण खाजगी क्लासेस मध्ये आणि परीक्षा महाविद्यालयांमध्ये लोकशाहीत सरकारने केला जनतेचा घात काँग्रेस आणि भाजपा दोन्ही एकच नाण्याच्या दोन बाजू दोन्ही पक्ष जनतेच्या समर्थनात कार्य करीत नाही उलट पक्ष बदलून निवडून येतात? 💔 BREAk-EVM 💔


भारतात काँग्रेस आणि भाजपाने बहुजनांचे राज्य येऊ न देण्याचे संकेत देश स्वतंत्र झाल्यापासून सुरू केले त्यापूर्वी इंग्रजांच्या राज्यात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांना शिकवण्यासाठी इंग्रज सरकारकडे पाठपुरावा केला मायबाप सरकार आमचे बहुजन शिकू द्या त्यामुळे इंग्रजांनी समान धोरण ठेवून बहुजनांसाठी शाळा शिकण्याची परवानगी दिली म्हणून आमचे काही ओबीसी एससी एसटी मराठा तुरळक ठिकाणी नोकरीला आहेत ही महात्मा ज्योतिराव फुले यांची कामगिरी आहे तर मनुस्फूर्ती मध्ये बहुजनांना शाळा शिकण्याचा अधिकार नव्हता त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतात शिक्षणाची बहुजनांसाठी मेक रोवली आणि बहुजन शिकले बहुजन म्हणजेच ओबीसी एससी एसटी मराठा हे पूर्वीचे छत्रपतींच्या काळातले मावळे यांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले गेले छत्रपतींची शिवशाही समाप्त कोणी का व कशासाठी केली? महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावर जाऊन छत्रपतींची समाधी शोधली आणि छत्रपतींचा अभ्यास करून छत्रपतींनी बहुजनांसाठी मावळ्यांसाठी काय कार्य केले ती पद्धत परत अमलात आणली म्हणजे शिवशाही अमलात आणली भारतात स्वतंत्र मिळाल्यापासून शिवशाही गेली कुठे छत्रपतींनी शेतकऱ्यांना जमिनीचे मालक बनवले ती खरोखर शिवशाही होती आज आमचे ओबीसी एससी एसटी मराठा खासदार आमदार निवडून जातात परंतु त्यांना शिवशाही काय होती आणि आपण ती परत आणावी ही इच्छा होत नाही फक्त बोलतात आणि स्वतः श्रीमंत होतात जनतेला वाऱ्यावर सोडतात संसदेत विधानसभेत झोपा काढतात का? आमच्या बहुजन महापुरुषांनी संतांनी शेतकऱ्यांना बहुजनांना जे स्वतंत्र दिले त्या स्वातंत्र्याची किंमत आमच्या नेत्यांना आमदारांना खासदारांना आहे का नाही? त्यानंतर आमचे पालक विद्यार्थी गप्प का? काही महाविद्यालयांनी खाजगी क्लासेसचे टायअप करून शिक्षणाचा अक्षरशः धंदा मांडला याचा आर्थिक फटका गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना बसत आहे त्यामुळे गोरगरिबांचे मुलं शिकतील कस काय यापूर्वी जे शिक्षण 15 ते 20 हजार मध्ये होत होते ते आता अडीच लाखावर गेले आर्थिक स्थिती सक्षम असलेले आपल्या मुलाला शिकवू शकतात ज्यांची आर्थिक स्थिती सक्षम नाही जे शेतकरी शेतीमध्ये राब राब राबवून शेती पिकवतात आणि शेतीमालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खातात त्यांना थोडीफार शरम वाटत नाही गोरगरीब शेतकरी वर्ग आपल्या मुलांना काय शिकवतील असा प्रश्न निर्माण झालेला आहे लोकशाहीमध्ये काँग्रेस आणि भाजपाने जनतेला भूकमरीच्या कदांरवर महागाई बेरोजगारी ढकलून दिले आहे भ्रष्टाचार तर विचारू नका भ्रष्टाचार विचारलं की जेलमध्ये जा ही लोकशाहीची पद्धत आणि त्यात शिक्षण महाग केले सरकारी शाळा बंद ठेकेदारांच्या शाळा चालू अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे गरिबांच्या शिक्षणाचा बँड बाजा वाजला खाजगी क्लासेस मुळे विद्यार्थ्यांची हजेरी एका दिवसात भरून टाकतात कारण ज्या विद्यार्थ्यांनी क्लास लावलेले असतात ग्रामीण भागातील काही विद्यार्थी क्लासेस लावून घेतात नेमकी परिस्थिती अशी होते की शिक्षण खाजगी क्लासेस मध्ये आणि परीक्षा महाविद्यालयामध्ये आमचे ओबीसी मंडळी भारतात 65 कोटी आहेत परंतु ते अजून पर्यंत झोपलेले असून सरकार काय करतय याकडे जाणून बुजून लक्ष देत नसून पुढे होणाऱ्या चुकांना सामोरे जावे लागणार आहे याची जाणीव त्यांना कधी होणार सरकार रोज काही न काही जनतेवर विनाकारण बोजा टाकण्याचे कार्यक्रम करीत आहे विकास अदानी अडाणी अंबानी यांचा करता आहेत त्या कार्यक्रमाच्या विरोधात ओबीसी कधी जागा होणार








Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button