लोकशाही म्हणजे काय? कुरूप्पू चित्रपटात न्याय धीशांचा लाचखोरीवर गदारोळ तामिळी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली मद्रास उच्च न्यायालयाने न्यायव्यवस्थेवर कठोर भाष्य केले न्यायव्यवस्थेत न्यायाधीश हे गाई सारखे पवित्र नाही लोकशाहीत (democracy) अशी शासन प्रणाली जिथे देशातील अंतिम सत्ता लोकांच्या हातात असते लोकांनी लोकंद्वारे आणि लोकांसाठी चाललेले राज्य याची साधी सोपी व्याख्या लोकशाही भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे हे फक्त बोलण्यासाठीच का? न्याय खरंच मिळतो का? जनतेला माहिती अधिकाराची माहिती मिळते का? त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये एफ आर आय ची दखल घेतली जाते का? न्यायव्यवस्थेत सर्व सामान्यांना खरा न्याय मिळतो का? तर_ _आम्ही लोकशाही पद्धतीने निवडून दिलेले प्रतिनिधी करतात तरी काय?

भारत देश हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला तो कोणासाठी? म्हणून 16 ऑगस्ट 1947 ला दुसऱ्या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 16000 महिला व पुरुषांचा मोर्चा आझाद मैदान मुंबई येथे काढला आणि घोषणा दिल्या/ यह आजादी झूठी है देश की जनता भूखी है लुटेरों की चांदी है! देश कोणासाठी स्वातंत्र्य झाला पाहिजे होता परंतु काही उच्चवर्णीय किरकोळ लोकांसाठी देश स्वतंत्र झाला का त्यांच्यासाठी न्यायपालिका आहे का? गरिबांसाठी न्याय नाही का? जनतेला न्याय मिळत नसेल तर एवढी मोठी लोकशाही कशासाठी? दर पाच वर्षांनी आमदार खासदार निवडून जातात ते जनतेच्या हितासाठी देशाच्या हितासाठी ते जर न्याय देत नसतील तर त्यांची नैतिक जबाबदारी ओळखून त्यांनी राजीनामा द्यावा पण तसे भारतात होताना दिसत नाही उलट त्यांनी आपले पगार भत्ता पेन्शन आणि भ्रष्टाचार मार्गाने संपत्ती वाढवून घेत आहे गरीब अधिक गरीब होत आहे भारत देशात बेरोजगारी महागाई ची आग लागली आहे आमचे प्रतिनिधी एक शब्द बोलायला तयार नाही आणि जनतेला गरिबीच्या खाईत लोटून दिले काही अपवाद चांगले आणि काही न्यायाधीश जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात देशात दोन दिवसांपूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने न्यायव्यवस्थेवर कठोर भाष्य केले कुरूपु या तामिळ चित्रपटावर बंदी घालण्यासाठी मागणी करण्याची याचिका फेटाळताना मद्रास उच्च न्यायालयाने न्यायव्यवस्थेवर अत्यंत क** आणि कठोर भाष्य केले आहे उच्च न्यायालयाने न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचे अस्तित्व मान्य केले आणि न्यायाधीशांना पवित्र काही सारखे वागवू नये असे म्हटले न्यायमूर्ती जीआर स्वामीनाथन आणि लक्ष्मीनारायण यांच्या खंडपीठाने नमूद केले की न्यायालयीन भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहे मद्रास न्यायालयाचे पूर्ण पीठ अशा भ्रष्ट न्यायाधीशांना नियमितपणे पदावरून दूर करते भ्रष्टाचार अनेकदा बार असोसिएशनच्या सदस्याकडून म्हणजेच वकिलांच्या गटाकडून केला जातो परंतु उच्च न्यायालय भ्रष्ट व्यक्तींना पकडण्यासाठी आणि परिस्थिती योग्यरीत्या हाताळण्यासाठी नेहमी सतर्क असते खंडपीठ आणि म्हटले आहे की जोपर्यंत बार असोसिएशनचे काही सदस्य भ्रष्ट व्यक्ती केवळ उच्च न्यायालयाच्या सतर्क देखरेखीमुळे पकडले जातात न्यायाधीशांना पवित्र मानले जाऊ नये खरी परिस्थिती हाताळण्याचा हाच योग्य मार्ग आहे न्याय ही काही लपलेली गोष्ट नाही त्याला छाननी आणि जनतेच्या स्पष्ट व रोखठोक मतांना सामोरे जाण्याची परवानगी दिली पाहिजे चित्रपटात न्यायाधीशांच्या लाच खोरीवर गदारोळ











