कोणीही न मागता शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट का मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंच्या कमिटमेंटला काहीच महत्व नाही का ? राज्याच्या तिजोरीत खडखडाट कर्जाचा बोजा १२ जिल्ह्यातली २७,५०० एकर जमिन जाणार शक्ती पीठ महामार्गाची मागणी कोणीही केलेली नाही
कोणीही न मागता शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट का एकनाथ शिंदेंच्या कमिटमेंटला काहीच महत्व नाही का? राज्याच्या तिजोरीत खडखडाट कर्जाचा बोजा १२ जिल्ह्यातली २७,५०० एकर जमिन लागणार या महामार्गाची मागणी कोणीही केलेली नाही पिढ्या न पिढ्यांच्या बागायत जमिनी शक्तिपीठ महामार्गात जाणार शेतकऱ्यांची सुपिक जमिन महामार्गात जाणार १२ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध महामार्गात वृक्षसंपदा वनविभागाची जमीन जाणार हजारो लाखो झाडं तोडली जाणार पर्यावरण जैवविविधतेवर दुष्परिणाम जलस्त्रोत भुजल पातळीवर परिणाम नद्या विहीरी पाईपालाईनचं नुकसान रस्त्याच्या उंचीमुळे पुराचा धोका भुगोल बदलणार पाण्याच्या प्रवाहावर परिणाम नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड परभणी लातूर धाराशिवला जोडणारा नागपूर-तुळजापूर हायवले पुर्वीपासूनच आहे तुळजापुरातून पंढरपूरला यायचं आहे तर पुणे-सोलापूर हायवे उपलब्ध आहे अक्कलकोटसाठी देखील पुणे-सोलापूर महामार्ग आहे पंढरपूरवरुन कोल्हापूरच्या अंबाबाईला जायचं असल्यास सोलापूर-कोल्हापूर हायवे आहे कोल्हापुरातून रत्नागिरीत जायचं असेल तर कोल्हापूर-रत्नागिरी हायवे आहे कोल्हापुरातून गोव्याला जायचं असेल आज्रा-आंबोली मार्गे रस्ता उपलब्ध आहे कोल्हापुरातून अदमापूरला जायचं असेल निपाणीमार्गे रस्ता आहे मग वेगवेगळ्या मार्गांची उपलब्धता असताना शेतजमिनींवरुन महामार्गाचा आग्रह का जनता नको म्हणत असताना गरज नसताना केवळ कंत्राटदार आणि टक्केवारीसाठी हा खटाटोप आहे का शक्तिपीठ महामार्ग नको असं हिंगोलीपासून कोल्हापूरपर्यंतच्या शेतकऱ्यांनी सांगितलं असतानाही हा प्रकल्प गरज नसताना का रेटला जातोय आपण लाख रस्ते विकास करु… पण सुपिक जमिनी तयार करता येणार नाही येत… उद्या या गरज नसलेल्या रस्त्यांच्या नादात शेतकऱ्यांनी काय दगड माती काँक्रिट खाऊन जगायचं का ज्या जमिनींच्या भरोश्यावर हजारो वर्षांपासून इथला भाग आबाद झाला सुबत्ता आली तिथं हा अनावश्यक रस्तेरुपी विकासाचा वरवंटा फिरवुन काय साध्य होणार आहे शक्तीपीठ महामार्ग नको असेल तर तो रद्द करण्याची मी घोषणा करतो ‘एक बार मैने कमिटमेंट दिया तो मै खुद का भी नही सुनता हुं’ असं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी शब्द दिला होता पण ३ महिन्यातच महायुती सरकारने शब्द फिरवला आणि शक्तीपीठ महामार्ग आता जबरदस्ती रेटण्याचा प्रयत्न होतोय अशी शेतकऱ्यांची भावना आहे या सगळ्या पट्ट्यातला शेतकरी जमिनीमुळेच सधन झालाय अनेक पिढ्यांना पोसणारी समृद्ध करणारी ही जमिनच काँक्रिटखाली घातली तर या शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी काय करायचं?आपल्याला कुठेतरी निसर्ग आणि विकास यात संतुलन ठेवावं लागेल विकासाच्या नावाखाली असुरी घास गिळत राह्यलो तर एक दिवस खायला पण काही शिल्लक राहणार नाही


