सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भर पुरावे भाजपाकडून चितळे समितीला कागदपत्रे सादर प्रत्येक पक्षाने तो विरोधी असो किंवा सत्ताधारी असो एकमेकांचे पितळ उघडे केले असते तर आज शेअर मार्केट मध्ये भारत देशाची रुपयाची किंमत झिरो 0 झाली नसती भारतातून सोन्याचा धूर निघणाऱ्या देशाची विल्हेवाट लावणारे आता जागे होत आहे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे

सिंचन घोटाळे करून पक्ष बदलून बदलून निवडून येतात तेच जनतेला आवडतात का?ka- भक्त लोकांना आवडतात? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे सो 100 चूवे खाके बिल्ली—चली भारत देशात घोटाळे करून आणि घोटाळे करणारे आणि घोटाळे करवुन घेतले जाणारे यांना शाबासकी मिळते हे निर्दोष सुटतात खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे यांचे काही वाकडे होत नाही फक्त जनता महागाईच्या तडाख्यात होरपळली जात आहे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे चितळे समिती पुढे सादर केले या घोटाळ्यातील अधिकारी व मंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी महाराष्ट्र राज्याने डॉक्टर माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली या समिती समोर घोटाळ्यांची कागदपत्रे सादर करण्यासाठी मे; कोर्टाने दिलेल्या परवानगी नंतर भाजप सरकारने वाजत गाजत बैलगाडी सह पुरावे चार सुटकेस मध्ये ठेवून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनोद तावडे यांनी बैलगाडी वरून चितळे समितीकडे जाताना दिसत आहे तसेच पवार आणि तटकरे यांना जेलमध्ये टाकू पुराव्यासह अशा घोषणाही देण्यात आल्या कृष्णा खोऱ्याचेही कागदपत्रे लवकरच सादर करणार त्यानंतर जळगाव जिल्ह्यातही सिंचन घोटाळ्यामध्ये मोठे घोटाळे झालेले आहेत कारण शासनाचा दरवर्षीप्रमाणे निधी येऊनही सुमारे तीन ते चार वर्षापासून कोणतेही काम झालेले नाही ते काम झाले असे दाखवून निधी गायब झालेला आहे प्रत्यक्षात दिसून येते अनेक पाटचारी धरण यांच्या नावाने अक्षरशः निधी खाऊन गेले त्यामुळे पाट दुरुस्ती न झाल्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये पाणी वाया गेले शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले नाही क्षेत्र अंदाजपंचे फिल्डवर शेतकऱ्यांकडून परस्पर पैसे घेऊन अंदाधुंदी कारभार जळगाव जिल्ह्यात मध्यम प्रकल्प तापी पाटबंधारे असो किंवा गिरणा पाटबंधारे असो दरवर्षीप्रमाणे येणारा निधी त्यांची कामे किती प्रमाणात झाली वरपासून ते खालपर्यंत किती कमिशन खाल्ले याचा अंदाज आला असेल वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावला तर ते साईडवर आहे असे सांगतात कमीत कमी निधी संपेपर्यंत काही ना काही कारण सांगत पत्रकारांना उल्लू बनवत असतात यांची चौकशी लवकर करण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेमार्फत होत आहे






