जिल्हा जळगाव पाचोरा भडगाव चे आमदार मा; किशोर पाटील यांची पत्रकार परिषद गाजली डीपीडीसी तून एवढा निधी मंजूर होतो निधी मंजूर करूनही विजेच्या समस्या सुटत नाही तर महावितरण नेमकं करता काय?

तालुका पाचोरा महावितरण अधिकारी यांना अनेक समस्यांविषयी आमदार माननीय किशोर पाटील यांनी प्रश्न उत्तर विचारले अनेक महिन्यापासून विजेच्या समस्या नागरिकांना होणारा त्रास लाईट बिल वेळेवर भरूनही वीज वाढीव वीज बिले कशी येतात कनेक्शन वीज मीटर आणि लाईट वेळेवर न देणे अनेक तक्रारी ही करून महावितरण अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या समस्या सोडवत नाही आणि शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी प्रश्न वीज वेळेवर मिळत नाही त्यामुळे मेहनत केलेले पीक वाया जात असतात आठ तास रात्री बेरात्री अवेळी लाईट देतात त्यातूनही चार-पाच तास लाईट चालते त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसतो अशा अनेक समस्यांवर बैठक झाली डीपीटीसीतून एवढा निधी मंजूर होऊन महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी करतात तरी काय काही ठिकाणी जास्त लाईट बिल प्रमाणाच्या बाहेर येते तर काही ठिकाणी तुम्ही अंदाज करू शकणार नाही एवढे बिल येतात अनेक समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आमदारांसमोर आपली कैफियत मांडली त्यावेळेस पत्रकार मित्र यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडली अनेक बातम्या देऊनही अधिकारी कर्मचारी बातम्यांना केराची टोपली समजतात शेतकऱ्यांच्या विषयी बोलताना आमदार पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर मिळवण्यासाठी त्या ट्रांसफार्मर वर जेवढे शेतकरी विजेचा वापर करत असतील तेवढे शेतकरी दोनशे पाचशे हजार प्रत्येकी जमा करतात अक्षरशः स्वतः डोळ्यांनी पाहिले कारण मी स्वतः ट्रॅक्टर वर जाऊन डीपी आणायचे काम करायचं ही प्रथा पूर्वीपासून सुरू झाली ती आज पाहतो बंद झाली नाही मी सुद्धा शेतकरी आहे नंतर पत्रकार पैसे दिल्यानंतरच त्यावेळेसच ट्रांसफार्मर बसवला जातो पाचोरा येथील प्रांत अधिकारी यांच्या दालनात महावितरणाची बैठक पत्रकारांसमोर झाली याप्रसंगी प्रांताधिकारी भूषण अहिरे पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील भूराप्पा पाटील शहर प्रमुख सुमित सावंत स्वीय सहाय्यक राजेश पाटील महावितरणाचे अधिकारी कर्मचारी पत्रकार उपस्थित होते या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार किशोर पाटील म्हणाले की पाचोरा भडगाव महावितरणाच्या संदर्भात अनेक तक्रारी आल्यामुळेच त्यानुसार तातडीची बैठक घेण्यात आली महावितरण संदर्भात आलेल्या तक्रारींचे निवारण केले व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघडणे केली अधिकारी कर्मचाऱ्यांना इशारा देण्यात आला महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आलेल्या तक्रारींचे निवारण करावे तसे न केल्यास कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट पाचोरा भडगाव आमदार माननीय किशोर पाटील यांनी सांगितले






