ताज्या बातम्या

जळगाव शहरातील धोकादायक विहिरी बुजवा अतिशय वेगवान पद्धतीने जळगाव जिल्ह्यात महानगर पालिकेच्या विकासाची कामे सुरू झाली आहेत फक्त कार्य आणि विकास करण्याची इच्छाशक्ती निर्माण झाली पाहिजे महापौर दीपमाला काळे यांनी त्वरित आयुक्तांना दिला आदेश धोकादायक विहिरी बंद करा


​जळगाव: शहरातील विविध भागांत असलेल्या महापालिकेच्या मालकीच्या उघड्या आणि असुरक्षित विहिरींमुळे जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी प्रशासनाला कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात त्यांनी मनपा आयुक्तांना लेखी पत्र देऊन तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.​पत्रात नमूद केल्यानुसार, जळगाव शहरात नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक सार्वजनिक विहिरींचा वापर केला जातो. मात्र, सध्या यातील अनेक विहिरी उघड्या स्वरूपात आहेत. या विहिरींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याचा धोका नाकारता येत नाही.महापौरांनी पत्रात दिलेल्या प्रमुख सूचना ​सार्वजनिक विहिरींचे बंदिस्तीकरण : शहरातील विविध परिसरातील मनपा मालकीच्या सर्व उघड्या विहिरींची पाहणी करून त्या तातडीने बंदिस्त करण्यात याव्यात.​अनुपयोगी विहिरी बुजवा : ज्या विहिरींचा वापर सध्या होत नाही आणि ज्या धोकादायक ठरत आहेत, अशा विहिरी त्वरित बुजवण्यात याव्यात.​खाजगी विहीर मालकांना नोटीस : सार्वजनिक विहिरींसोबतच ज्या खाजगी मालकांच्या विहिरी उघड्या आणि धोकादायक आहेत, त्यांच्यावरही योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
​नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ठेवून महापौरांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आता मनपा प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे जळगावकर जनतेचे लक्ष लागले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button