भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रीय संपत्तीची लुटमार वाचवण्यासाठी थेट जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा सह अनेक IAS अधिकारी विरुद्ध पटवारी विनोद कुमार कवडुजी खोब्रागडे यांचे बंड असे सुरुवाती पासून समाज बांधव जागृत राहिले असते तर आज कोणत्याही प्रधानमंत्री यांची भ्रष्टाचार करण्याची आणि देश विकण्याची ताकद राहिली नसती संविधान कशासाठी दिल अजून पर्यंत जनतेला समजलं नाही

भारतातील जनतेला राजकारण्यांनी म्हणजेच काँग्रेस आणि भाजपाने संविधान सोडून धर्मकांडात अडकवण्याचे कार्य केले सत्तेसाठी विज्ञान युगात आपली बुद्धी चा वापर करावा
आज भ्रष्टाचार प्रकरणात माननीय कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा रेल्वेच्या ठेकेदार सिद्धार्थ गुप्ता सह जिल्हाधिकारी चंद्रपूर सह अनेक IAS अधिकारी विरुद्ध दाखल फौजदारी पीटिशन मध्ये आदेश करणार जिल्हाधिकारी हे जिल्ह्याच्ये कलेक्टर असतात तर पटवारी हा गावचा कलेक्टर आहे कायद्यापुढे सर्व समान आहेत दोघेही जनतेचे पगारी नौकर आहेत IPC कलम 21 नुसार लोकसेवक आहेत राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण करणे हे दोघांचेही कर्तव्य आहे तसेच नागरीकांचे सुद्धा भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 क,क नुसार 10 ते 11कर्तव्य आहेत आपल्या देशात मतदानाचा अधिकार पासून सर्व काही फुकट भेटले आहे, म्हणून नागरीकांना आपला अधिकार कळत नाही,ही शोकांतिका आहे सनदी अधिकारी अर्थात IAS अधिकारी विरुद्ध फौजदारी कारवाई करन्यासाठी आता केंद्रीच्या परवानगीची गरज नाही असे माननीय सुप्रीम न्यायालयाचे न्यायमूर्ती यांचे अनेक जजमेंट आहेत म्हणून मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर,सह अनेक IAS, अधिकारी विरुद्ध पटवारी विनोदकुमार खोब्रागडे यांचे बंड ज्याअर्थी मा.सुप्रीम न्यायालयाचे चार चार न्यायमूर्ती, दिनांक 12/01/2018 रोजी मा. सरन्यायाधीश विरुद्ध पत्रकार परिषद घेऊन बंड करु शकतात त्याअर्थी पटवारी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे हे जिल्हाधिकारी चंद्रपूर व इतर अधिकारी यांचा अन्याय अत्याचार विरुद्ध बंड का करु नये?अखेर भ्रष्टाचार प्रकरणात मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी सी साहेब यांच्या सह, सहा IAS अधिकारी विरुद्ध मा.लोकपाल न्यायमुर्ती अजय खानविलकर साहेब यांच्या न्यायालयात पुराव्यानिशी 1 ते 195 पेज सह फौजदारी खटला लोकपाल अधिनियम 2013 चां कलम 14 नुसार दाखल मा.सुप्रीम न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपाकंर दत्ता व न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने क्रिमिनल अपील 5001/2024 मध्ये दिनांक 17/02/2025 रोजी महत्त्व पुर्ण जजमेंट दिले आहे की, भ्रष्टाचार प्रकरणात FIR रजीष्टर करतांना चौकशी नको मा.सुप्रीम न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायमूर्ती आर.एम.लोढा साहेब व त्यांच्या खंडपीठाने सुद्धा 2014 मध्ये निर्वाळा देताना म्हटले आहे की सनदी अधिकारी IAS असले तरी त्यांच्या वर फौजदारी कारवाई करण्यासाठी केंद्राच्या परवानगीची गरज नाही दोन्ही संदर्भ घेऊन ६ भ्रष्टाचारी IAS अधिकारी व इतर अधिकारी यांची थेट नावासह, गंभीर तक्रार शपथपत्रा सह माननीय लोकपाल न्यायमूर्ती श्री.अजय खानविलकर साहेब नई दिल्ली यांच्या न्यायालयात दाखल केली आहे महसूल प्रशासनात प्रचंड खळबळ जनप्रतिनिधी संघर्षी आयु विनोद कवडुजी खोब्रागडे यांनीच दाखल केली फौजदारी खटला ज्याअर्थी महाराष्ट्र शासन यांना अनेकदा गंभीर तक्रार करूनही सदर प्रकरणात चौकशी करण्यास अकार्यक्षम ठरली उलट प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा याच्यात सामील असतात देशावर कर्ज चा डोंगर करीत आहे यांना लाज वाटत नाही म्हणून चौकशी लावत नाही म्हणून फिर्यादी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी लोकपाल अधिनियम 2013 चां कलम 14 नुसार भ्रष्टाचारी अधिकारी विरुद्ध फौजदारी खटला शपथपत्रासह दाखल केले आहे
महसूल प्रशासनात प्रचंड खळबळ
सदर प्रकरणात आरोपी
1) विनय गौडा जी सी जिल्हाधिकारी चंद्रपूर IAS अधिकारी आहेत
2) अजय अण्णासाहेब गुल्हाने तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर IAS अधिकारी आहेत
3) शांतनु गोयल तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी चंद्रपूर IAS अधिकारी आहेत
4)दोन्तुला जेनित चंद्रा सहाय्यक जिल्हाधिकारी वरोरा जिल्हा चंद्रपूर IAS अधिकारी आहेत
5)अजीत बाबुराव पवार तत्कालीन उप जिल्हाधिकारी चंद्रपूर IAS अधिकारी आहेत
6)संजय वामन पवार उपविभागीय अधिकारी चंद्रपूर
7) विजयलक्ष्मी बिद्री विभागीय आयुक्त नागपूर IAS अधिकारी आहेत हे सर्व मुख्य आरोपी असुन सखोल चौकशी मध्ये उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी अनेक तहसीलदार अनेक मंडळ अधिकारी व अनेक पटवारी घरी जाऊ शकतात तसेच आयुक्त महानगरपालिका चंद्रपूर सब रजिस्ट्रार चंद्रपूर विज वितरण अधिकारी व बँक मॅनेजर यांच्या वर सुद्धा फौजदारी कारवाई ची मागणी पीटिशन मध्ये केली आहे चंद्रपूर शहरातील महानगरपालिका हद्दीतील 500 एकर सरकारी जमीनीची बेकायदेशीर विल्हेवाट लावणे व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून सरकारचे 25-30 हजार करोड रुपयांचे नुकसान करणे जिवती तालुक्यातील मय्यत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना लाभार्थी चे करोडो रुपयांचा हेराफेरी करून शासनाची फसवणूक करणे भ्रष्टाचार करणे जिवती तालुक्यातील मौजा कुंसूबीचा आदिवासी च्या गावाचा बेकायदेशीर ताबा खाजगी कंपन्या यांना देणे अनेक कंपन्या यांना बेकायदेशीर लिज देऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून भ्रष्टाचार केले आहेत भद्रावती तालुक्यातील मौजे बरांज मोकासा येथील सरकारी जमीन खाजगी कंपन्याला बेकायदेशीर देवाण घेवाण वरोरा तालुक्यातील मौजे नायदेव येथील जमिनी व फत्तापुर येथील सरकारी जमीनीची विल्हेवाट लावणे असे अनेक भ्रष्टाचार या अधिकारी यांनी केले आहे हे सर्व आरोप विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी यांनी पुराव्यानिशी महाराष्ट्र शासन यांना दिली मात्र मंत्रालय येथेही अनेक भ्रष्टाचारी अधिकारी असल्यामुळे न्याय मिळाला नाही अखेर लोकपाल मा.न्यायमुर्ती अजय खानविलकर साहेब यांच्या न्यायालयात लोकपाल अधिनियम 2013 चां कलम 14 अंतर्गत खटला दाखल केला आहे सरकार कडून पगार घेनारे सर्व अधिकारी कर्मचारी न्यायधीश आमदार खासदार मंत्री हे भा.द.वि.कलम 21/2,3,6 नुसार लोकसेवक आहेत अधिकारी भ्रष्टाचार करत असतील तर बोगस आदेश कायद्याच्या बाहेर जाऊन नियमबाह्य व बेकायदेशीर आर्थिक लाभ घेऊन पदाचा गैरवापर करत असेल तर त्यांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यासाठी व कारवाई करण्यासाठी डायरेक्ट मा.लोकपाल अधिनियम 2013 चां कलम 14 नुसार बंद लिफाफा मध्ये नावासह गंभीर तक्रार करावे इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा बातम्या प्रसिद्ध करत नाहीत व जनजागृती करत नाहीत भारत देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही राज्य नियमावली भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम 2023 कलम 33 पहा चंद्रपूर जिल्हा अंतर्गत बाब आहे समाजहितासाठी देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे




