आरसी बुक वर पत्ते बदलले शहर सोडून गेले कुठे ?? महिन्यातच 201 आरसी बुक परत आले ऑनलाइन सिस्टीम फक्त जनतेसाठी भ्रष्टाचार करणाऱ्यांसाठी नाही का??

जळगाव जिल्ह्यातील आणि संपूर्ण खानदेश ात आरटीओ खात्यावर भ्रष्टाचारांचे आरोप त्यातच आणखी भर पडली ती आरसी बुकची नवीन ठिकाणी राहायला गेले किंवा बदल्या झाल्या किंवा इतर कारणामुळे वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्रा वरील पत्ता बदलला जातो मात्र अनेक वेळेस पत्ता पूर्ण नसल्यामुळे आरसी बुक परत येतात यातूनच टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांची दमछाक होत असते पत्ता विचारून विचारून अक्षरशः टपाल कर्मचारी रड कुंडीत येतात त्यामुळे पत्ताधारकांनी आपला पूर्ण पत्ता नमूद करावा असे आरटीओ खात्याने एक पत्र जारी केले आहे आपला पूर्ण पत्ता द्यावा अपूर्ण पत्ता दिल्यास वाहनधारकांना शुल्क भरावा लागेल याची खबरदारी घ्यावी आरसी बुक न मिळाल्यामुळे अडचणी व तक्रार वाढत असल्यामुळे आपला पत्ता पूर्ण माहितीसह फोन नंबर द्यावा तरच आरसी बुक आपल्यापर्यंत सुरक्षित पोहोचेल असे आरटीओ विभागाने सांगितले आहे पत्ता चुकीचा असल्यामुळे दर आठवड्याला चार ते पाच आरसी बुक परत येतात पत्ता बदल झाला असेल तर पत्ताधारकाने काय करावे रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय वाहन ई सेवेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करून स्क्रीनवर दर्शवल्याप्रमाणे यूजर आयडी पासवर्ड सुरक्षा कोड टाकून सबमिट करावे त्यानंतर ऑनलाइन सर्विस वर क्लिक करून वाहन संबंधित सेवा निवड करावी वाहन नोंदणी क्रमांक चेसिस क्रमांकाचे 5 शेवटचे नंबर टाकावे जनरेट ओपीटी बटनावर क्लिक करून नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओपीटी टाकून सबमिट करावे त्यानंतर वाहन परवान्यातील पत्ता बदल करता येऊ शकतो आरसी बुक सह वाहन परवाण्यावरही बदल करता येऊ शकतो आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रक्रिया आपण पूर्ण करू शकतो जिल्ह्यात वाहन परवानाधारकांनी आपल्या परवान्यावरील पत्त्यांमध्ये बदल केले पत्ता अपूर्ण असल्यामुळे 73 जणांचे वाहन परवाने परत आले सध्या स्मार्ट आरसी चा वापर सुरू असून नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वाहन नोंदणी प्रमाणपत्र आरसी बुक त्वरित दिले जाते या सिस्टीमच्या पहिले ऑफलाइन सिस्टीम वाहन खरेदी केल्यानंतर आरसी बुक त्या विक्रेत्याकडे किंवा डीलर्सकडे आरसी बुक मिळत होते मात्र परिवहन विभागाने कागदी आरसी बुक परवाना बंद करून नवीन स्मार्ट कार्ड योजना लागू केली जनतेसाठी ऑनलाईन लायसन पत्ता बदल नवीन वाहन खरेदी यासाठी ऑनलाइन सुविधा सुरू केली असून फक्त सरकारी शुल्क व ऑनलाईन वाल्याचा चार्ज भरावा लागतो पण अजूनही आपले शिकलेले तरुण दलालामार्फत कामे करतात व जास्त पैसे लागतात आता ऑफलाइन योजना कशी असते ऑफलाईन योजना म्हणजेच चोरी करणे आता चोरी कोण करतात आणि कशाप्रकारे करतात याची सिस्टीम मागच्या न्यूज मध्ये टाकलेल्या होत्या मंत्री संत्री पुढारी आमदार खासदार आणि देशातील प्रधानमंत्री यांनी ऑनलाईन सिस्टीम सुरू केली मग ऑफलाइन सिस्टीम कोणासाठी कशासाठी?? फार मोठा विचित्र घोटाळा भ्रष्टाचार ऑफलाइन मध्ये होतो भ्रष्टाचाराची लक्तरे तोडणारे अधिकारी यांच्या न्यूज पण मागील न्यूज मध्ये टाकल्या होत्या


