ताज्या बातम्या

निवडणुकीपूर्वी शेतकरी राजाचा सातबारा कोरा करणार असे आश्वासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केल्यानंतर अजूनही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही त्यासाठी शेतकरी आंदोलन संसद भावनाला घेराव घालण्यासाठी मुंबईकडे निघाले असता शेतकरी मोर्चावर पोलिसांचा लाठी चार्ज तर— शेतकऱ्यांनी मुंबई पोलिसांची तटबंदी भेदून शेवटी अरबी समुद्रात सातबारा बुडवलाच


शेतकऱ्यांच्या शेतीमाला भाव देत नाही शेतकऱ्यांना आंदोलन करू देत नाही लोकशाहीत न्याय मिळत नसेल तर शेतकऱ्यांसाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही शेतकरी मोर्चा मुंबई संसद भवनावर निघाला शेतकरी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकारच्या सांगण्यावरून पोलिसांनी प्रचंड बाळाचा वापर केला क्रांतिकारी शेतकऱ्यांचे आंदोलन जिंकून टाकण्यासाठी पोलिसांनी आकाश पाताळ एक केले एवढ्यानंतरही बीडचे क्रांतिकारी शेतकरी पुत्र कुलदीप करपे व त्यांचे सहकारी बुधवारी मुंबई पोलिसांची तटबंदी भेदून बोटीद्वारे अरबी समुद्रात दाखल झाले अरबी समुद्रात कर्जाचा बोजा असलेला सातबारा तसेच काडीमोल भाव न मिळाल्याने तीन वर्षापासून घरात पडलेला कापूस सोयाबीन अरबी समुद्रात बुडवले यावेळी आम्ही कर्जमुक्त होणारच अशा घोषणा दिल्या तसेच रविकांत भाऊ तुपकर व आंदोलन शेतकऱ्यांचा खालापूर येथे लाठ्या काठ्या आणि बंदूक घेऊन आलेल्या पोलिसांना जेवण पाणी देण्याची दानद शेतकऱ्यांमध्येच असते हे दाखवून दिले क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मुंबईतील आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी प्रचंड बळाचा वापर केला सरकारच्या इशारावर तूपकर व त्यांचे कुटुंबीय शेतकरी कार्यकर्ते यांचा अक्षरशः हाल हाल केले शेतकऱ्यांना एक पाऊल पुढे टाकू द्यायचे नाही यासाठी पोलीस काठ्या आणि बंदुका घेऊन आले होते याही परिस्थितीत भल्या पहाटेपासून सायंकाळी पाच पर्यंत शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकरी व पोलीस बांधवांची चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था रविकांत तुपकर यांनी केली दुश्मनांवर दातृत्व दाखवण्याची दानत फक्त आणि फक्त शेतकऱ्यांमध्येच असते अखेर शिलेदारांनी पोलिसांची तटबंदी भेदून दुपारच्या रखरखत्या उन्हात पोलिस आणि शेतकरी कार्यकर्त्यांमध्ये चांगला र***झाला तब्बल तासभर पोलीस व शेतकरी यांच्या संघर्ष सुरू होता शेतकरी घोषणा देत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते तर शंभर पेक्षा जास्त पोलिसांनी काठ्या आडव्या लावून त्यांना मागे लोटत होते शेवटी रविकांत तुपकर व त्यांच्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांना अटक करत खालापूर जिल्हा रायगड पोलीस ठाण्यात नेले व सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली दरम्यान सरकारने पोलिसांचे प्रचंड बळ वापरून क्रांतिकारी शेतकरीचे आंदोलन चिरडून टाकले यामुळे संपूर्ण राज्यातून व देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे तीन वर्षापासून घरात पडून असलेले सोयाबीन कापूस सातबारा उतारा आम्ही समुद्रात बुडवत आमचे आंदोलन शांततेत आहे एकीकडे गुंड दरोडेखोर आणि व्हाईट कॉलर भ्रष्टाचार करणारे न्यायाधीश यांना रान मोकळे केले आणि जो रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतीत मेहनत करतो त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव दिला जात नाही हल्लीचे सरकार विदेशातून शेतीमाल आयात करतात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळू देत नाही आणि शेतकऱ्यांना लोकशाही मार्गाने साधे आंदोलन करू देत नाही हे हिटलर शाही सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकतात हा कुठला न्याय आहे चोर गुंडे भ्रष्टाचारी बलात्कारी यांना जेलमध्ये टाकण्याची यांची ताकत नाही भारतातील में सुप्रीम कोर्टात 23 चे 23 जज उच्चवर्णीय आहे ते भारतात 85 कोटी ओबीसी आहेत त्यामध्ये आरक्षणानुसार मे सुप्रीम कोर्टात संविधानानुसार 10/11 असायला हवेत सगळीकडे राज्य उच्चवर्णीयांचे शेतकऱ्यांविषयी ते खरोखर न्याय देत नाही उलट सत्ताधाऱ्यांसाठी खोटे काम करून आडमाप पैसा कमवत आहे शेतकऱ्यांना भिकेलां लावून अंबानी अडाणी आदानी यासारख्या मोठ्या उद्योगपतींना करोडो रुपये कर्ज माफ करत आहे त्यांना आदिवासीची जमिनी फुकटमध्ये घेत आहे काडीमोल भावात सरकारच्या सांगण्यावरून पोलिसांनी आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाहीत आम्ही संसदेला घेराव आणि अरबी समुद्रात आंदोलन करणारच असा इशारा तूपकर यांनी दिला निवडणुकीपूर्वी संपूर्ण सातबारा करण्याचे आश्वासन दिले होते पण त्याबाबतीत एकही शब्द बोलत नाही उलट त्या विषयाला बगल देऊन औरंगजेबाची कबर खोदण्याचे कार्यक्रम करत आहे वेगळेच विषयाची वळण सरकार घेत आहे शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये कर्जमाफी योजनेतील घोषणा अजित दादा पवार यांनी का केली नाही फक्त निवडून येण्यासाठी घोषणा करतात का? यांनी महा घोटाळे केले तरी चालते हे पक्ष बदलून निवडून येतात घोषणा करतात शेतकऱ्यांच्या जीवावर पैसा कमवून स्विस बँकेमध्ये ठेवतात आणि संपूर्ण देशाचे काँग्रेस आणि भाजपाने वाटोळे केले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button