गुन्हे

क* बाजारात जाणारे रेशनचे 11 क्विंटल धान्य पकडले प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात दर महिन्याला चोऱ्या होतात मोठ्या चोऱ्या सुयोग्य पद्धतीने दाबल्या जातात


यापूर्वी मराठवाडा येथील जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील शासकीय गोदामात 1200 क्विंटल गहू कमी आणि 600 क्विंटल तांदूळ जास्त आढळला आयुक्तालयाच्या पथकाने गुन्हे दाखल करण्याच्या ऐवजी मुंबईहून जालना अधिकाऱ्यांना तीन दिवसीय समिती नेमून कार्यवाहीचे आदेश दिले कमी आढळलेल्या 600 क्विंटल गहू गोदामात जमा झाल्याचे दाखवून घोटाळा दडपण्याचा प्रयत्न केला यामुळेच चोरी करणारे देशाला लुबाडणारे करोडपती होत आहे असे अनेक प्रकार प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात होत असतात त्यानंतर आजची ताजी घटना जिल्हा संभाजीनगर तालुका सोयगाव जरंडी येथे ग्रामस्थांची महत्वपूर्ण कामगिरी 11 क्विंटल धान्य क*****बाजारात विक्री करण्यासाठी ओमिनी गाडी सह तीन मोटरसायकल जरंडी पकडले या वाहनात गहू व तांदूळ ११ क्विंटल होते ते सर्व धान्य सोयगाव पोलीस यांनी ताब्यात घेतल्या असून पुढील तपास सोयगाव पोलीस निरीक्षक करीत आहे पोलिसांच्या माहितीनुसार ओमिनी गाडी एम एच 43 व्ही 6288 सह एम एच 20 बी व्ही0082 एम एच 20 एव्ही 94 82 आणि एम एच 20 ए यु 9679 या तिन दुचाकीवरून रेशनचे धान्य एकूण दहा जण सिल्लोड येथे क** बाजारात विक्रीसाठी घेऊन जात होते ही गुप्त माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन जरंडी येथे सापळा रचून युवा ने गावातून बाहेर निघताच त्यांच्या वर ग्रामस्थांनी झडप मारली या वाहनांची तपासणी केली असता त्यात रेशनिंगचा गहू व तांदूळ आढळल्याने त्यांना विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली त्यातील काही ग्रामस्थांनी सोयगाव पोलीस स्टेशनला फोन लावून पोलिसांना बोलावले सोयगाव येथील तहसीलदार मनीषा मेने यांच्याशी जरंडी येथील उपसरपंच यांनी संपर्क साधला असता आपण या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करा असे स्पष्ट सांगितले दरम्यान गावातील उपसरपंच सरपंच व ग्रामस्थांनी सांगितले की प्रत्येक वेळेस धान्य काळा बाजारात जाते याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितावर क** कारवाई करावी अशी मागणी उपसरपंच संजय पाटील यांनी केली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button