जनतेसाठी रक्षक असणारे पोलिसांनाच चोरट्यांनी लुटले जनतेचे काय? सध्या कोयता गॅंग प्रसिद्ध झाली असून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आवर घालतील का? कायदे कोणासाठी?
पुणे जिल्ह्या नंतर आता सोलापूर जिल्ह्यात कोयता गॅंग ने धुमाकूळ घातला असून पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस स्टेशन येथील कार्यरत असलेल्या पोलीस शिपायांना कोणत्या चार अनोळखी चौकडीने लुटमार केली यामध्ये एक मोबाईल सोन्याची अंगठी व नगदी तीन हजार रुपये बळजबरीने लुटून नेण्याची घटना काल दिनांक 7/1 2025 रात्री पैठण येथील पाचोड महामार्गावर घडली या प्रकरणी चार अज्ञात कोयता गॅंगच्या चौकडीच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पाचोड पोलीस ठाण्यातील जमादार रवींद्र आंबेकर वय 41 वर्ष कडेठाण बीट हवलदार म्हणून काम पाहतात आपली ड्युटीवर असताना पैठण रस्त्यावरील भुमरे पेट्रोल पंपा जवळ अचानक दोन चाकी गाड्या आल्या 25 ते 30 वयोगटातील तरुण मुले अचानक बीट हवालदार आंबेकर यांना आवाज देऊन थांब रे एकेरी भाषेत बोलले आवाज ऐकून आंबेकर हे थांबले व चौघे त्यांच्याजवळ आले तुझ्याजवळ काय आहे ते आम्हाला दे असे म्हटल्यावर आंबेकर यांनी कोयता गॅंगला पोलीस असल्याचे सांगितले ते चोर शेवटी चोरच असतात आंबेकर सांगत होते पण ते ऐकायच्या मूडमध्ये नव्हते लागलीच त्यांनी कोयता काढला व कोयत्याचा धाक दाखवून तुझ्याकडे काय आहे ते ते आम्हाला दे असा दम भरला आंबेकर यांनी लागली चार ग्रॅम सोन्याची अंगठी रोख तीन हजार रुपये आयफोन कंपनीचा प्रो 13 मोबाईल दिला चोरट्याची हिंमत वाढली असून गृहमंत्री यांनी लवकर लक्ष द्यावे अशी जनतेतून मागणी होत आहे संविधानाचा वापर कोणासाठी? अवैध धंदे जोरात सुरू आहे आता कुठेही रस्त्यावर ऑनलाईन गेम दारू सट्टा मट्टा चे दुकान जोरात सुरू आहे गृहमंत्री लक्ष देतील का


