सोशल मीडियावर यांचे काळे कारनामे प्रसिद्ध झाले तर_ मागील व आताचे सरपंच थेट पोलीस स्टेशन मध्ये FRI म्हणजेच चोरी उघड केली तर यांना खटकले म्हणून चांगले काम करणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आजी-माजी सरपंच एकत्र लोक_ शाहीत सगळेच ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली ग्रामपंचायतीचा पैसा : व्यक्तीचा नव्हे, गावाचा! गावाची परंपरा म्हणून आजवर झालेली लूट संपवण्याची वेळ आली आहे ग्रामपंचायत म्हणजे गावाचा विकास, सोय-सुविधा, पारदर्शकता आणि लोकशाही यांचे वास्तव स्वरूप परंतु अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे एक “परंपरा” निर्माण झाली आहे—ग्रामपंचायतीचा पैसा हा जणू काही व्यक्ती किंवा गटाचा खासगी मालमत्ताच आहे! ही चुकीची परंपरा आजही सुरू आहे आणि तिचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसतो.

१.) गावाची धोकादायक परंपरा : पंचायत निधीचा वैयक्तिक वापर अनेक वर्षांपासून काही गावांत काय दिसते?निलावाची रक्कम व्यक्तीगत खात्यांमध्ये वळते,पावत्या गावकऱ्यांना दाखवायच्या नसतात,कामे कागदावर दाखवून पैसे खिशात,“आम्ही दिले”, “आम्ही खर्च केला” असा खोटा मोठेपणा,निर्णय ग्रामसभेऐवजी काही निवडक लोक ठरवतात.ही परंपरा गावाची नाही,तर गैरव्यवहार करणाऱ्यांची, गावाला मागे ठेवणाऱ्यांची आणि जनतेच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्यांची आहे.—२.) गावाचा पैसा कुणाच्या घरचा नाही ग्रामपंचायतीचा पैसा म्हणजे संपूर्ण गावाच्या हक्काचे उत्पन्न.यात— कर, निलाव, करारनामे, बाजार शुल्क, शासन अनुदान — या सर्वातून मिळालेली रक्कम सामावलेली असते.हा पैसा :एकट्या सरपंचाचा नाही सदस्यांचा नाही ठराविक गटांचा नाही तो प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.मग काही लोक “हा पैसा आम्ही दिला” असे म्हणतात तेव्हा ते गावाला चुकीच्या दिशेने नेतात गावाच्या पैशातून उपकार दाखवणे म्हणजे हक्काची गोष्ट उपकारासारखी विकणे होय.
—३.) वर्षानुवर्षांची लूट आता थांबलीच पाहिजेगावातील नागरिकांनी टाळी दिली, की काम झाल्यासारखे दाखवणारी ही जुनाट परंपरा मोडायची वेळ आली आहे.ही लूट कशी घडली?ग्रामसभेत माहिती लपवून,कागदपत्रे न दाखवता,कामे दाखवून बिले काढून निलावाची रक्कम गावच्या खात्यात न भरता,पाळणे, आठवडे बाजार, दुकाने, कर यांची वसुली हातोहात फिरवून.या सर्व प्रक्रिया गावाच्या परंपरेच्या नावाखाली वैयक्तिक संपत्ती वाढवण्याचे साधन बनल्या.
ही परंपरा नष्ट झाली तरच गाव विकासाच्या मार्गावर येईल.
—४.) नागरिकांचे हक्क – पारदर्शकता मागणे ही गुन्हा नाही गावातील प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे :बिले, पावत्या, खातेपुस्तक तपासण्याचा निलावाची रक्कम कुठे जमा झाली हे विचारण्याचा RTI दाखल करण्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा गैरव्यवहारावर कारवाई मागण्याचा कारण जनतेचा पैसा कुणाच्या घरचा नाही, कुणाच्या मानाचा नाही, कुणाच्या हुकूमशाहीचा नाही.—५.) खरा बदल कधी येणार? खरा बदल तेव्हा येईल जेव्हा गावातील लोक म्हणतील :“ही लूट आमची परंपरा नाही.”“आम्ही प्रश्न विचारणार.”
“निधीचा वापर कायद्यानेच व्हायला हवा.”“गावाचा पैसा गावाच्या बँक खात्यातच जमा व्हायला हवा.”
“आम्हाला पावती, बिले, कागदपत्र पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे.”—निष्कर्ष :ग्रामपंचायतीचा पैसा हा जनतेने दिलेला, जनतेचा पैसा आहे.आजवर काही लोकांनी गावाची परंपरा सांगून, सत्ता दाखवून किंवा नावाच्या मोठेपणासाठी या पैशाची लूट केली — हे गावाला शोभणारे नाही ही परंपरा मोडण्याची वेळ आता आली आहे.गावाच्या विकासासाठी, पारदर्शकतेसाठी आणि जनहितासाठी ग्रामपंचायतीचा पैसा गावाचाच राहू द्यावा.









