कर्जमाफी बाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे व्यक्तव्य दैनिक प्रहार दि 26 फेब्रुवारी मुंबई प्रवक्ता राज्यातील शेतकरी कर्जमाफी अंमलबजावणी बाबत मोठी माहिती समोर येत आहे कर्जमाफीचा लाभ शेतकरी पुत्रा ंपर्यंत पोहोचवण्यासाठी ॲग्रीस्टॅक या डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे बँकांकडून होणाऱ्या चुका आणि त्यात दलाली करणारे अफरातफर शेतकऱ्यांच्या नावाने पैसे लुटारु खोटे आंदोलन करून पैसे लाटणे आता बंद होणार डायरेक्ट शेतकऱ्यांच्या नावावर कर्जमाफीची सूट योजना

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार घेतली त्यात त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आमचे सरकार शेतकरी कर्जमाफीसाठी समिती गठीत करून ॲग्रीस्टॅक प्रणाली द्वारे होणार कर्जमाफीचे वाटप होणार आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करू याबाबत नेमकी तारीख न सांगितल्यामुळे कर्जमाफी बाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मागील अनेक वेळी कर्जमाफी बाबत माहिती दिली आम्ही कर्जमाफी करू मुख्यमंत्र्यांनी आता तारीख डिक्लेअर करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की अनेकदा बँकांकडून चुकीच्या पद्धतीने कर्ज खात्याची माहिती दिली जाते काही ठिकाणी जुन्या किंवा अपात्र खात्यांची माहिती देऊन सरकारकडून मध्यस्थाकडून निधी लाटण्याचे प्रकार घडतात त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही तो लाभ देण्यासाठी ॲग्री स्टॅक प्रणाली द्वारे आम्ही कर्जमाफी करू काही ठिकाणी जुन्या किंवा अपात्र खात्यांची माहिती मिळत नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना खरोखर मदतीची गरज आहे ते लाभापासून वंचित राहतात या त्रुटी दूर करण्यासाठी आता पारंपारिक रेकॉर्ड ऐवजी डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे म्हणजेच ऍग्री स्टॅकच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याचा एक डिजिटल आयडी तयार केला जातो या शेतकऱ्यांची जमीन पीकपेरा आणि कर्ज तपशील आधार कार्डशी लिंक असतो त्यामुळे बँकांना जुनी किंवा चुकीची खाती दाखवता येणार नाही केवळ गरजू आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातच कर्जमाफीचे पैसे जमा होतील ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान विधानसभेत गुरुवारी 26 फेब्रुवारी रोजी बोलताना मुख्यमंत्री फडवणीस यांनी स्पष्ट केले की शेतकरी कर्जमाफीसाठी एक समिती गठीत करण्यात आली असून त्याचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे दिलेली सर्व आश्वासने योग्य वेळी पूर्ण केली जातील असे त्यांनी सांगितले राज्यपाल यांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनीही माहिती दिली नवीन डिजिटल प्रणालीमुळे कर्जमाफीची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होत आहे









