ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा हिरवाथडी आणि अनेक गावांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्यामुळे विहिरीत पाणी असून सुद्धा वीज पुरवठा सुरळीत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात येणारा शेतीमाल हातातून जाण्याची शक्यता? मा; आमदार किशोर पाटील साहेबांनी वीज मंडळाकडे लक्ष द्यावे तसेच शिवसेना तालुकाप्रमुख विनोद भाऊ तावडे


पाचोरा तालुक्यातील अनेक खेड्यातील परिसरातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अपुऱ्या वीजपुरवठामुळे वाया जाणार विहिरीमध्ये पाणी उपलब्ध असून सुद्धा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून त्यामुळे इलेक्ट्रिक मोटर वारंवार खराब होऊन जळत आहे शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून मा; पाचोरा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी लक्ष देऊन वीज मंडळाला भेट द्यावी अशी विनंती शिवसेना तालुकाप्रमुख विनोद भाऊ तावडे यांनी सुद्धा वीज मंडळ यांच्याकडे भेट द्यावी अशी विनंती शेतकरी बांधव करीत आहे शेतीपंपासाठी आठ तास विज देण्याचे नियोजन असताना देखील वीज पुरवठा सुरळीत देत नसल्याने वीज महामंडळ यांनी तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करावा पिकाच्या परिक्वतेच्या काळा पुरेसे पाणी येता येत नसल्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांची रब्बी पिकावर सगळे अशा अपेक्षा अवलंबून आहे मात्र अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे आता तोंडाशी आलेला घास जाण्याची शक्यता आहे विहिरीत पाणी आणि वीज नाही यामुळे खर्च वाया जाईल शेतकरी आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत

ते


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button