वैचारिक परवड लेखन सामाजिक कार्यकर्ते ललिता पाटील आपले विचार आपल्या कंट्रोल मध्ये पाहिजे संचालिका स्पंदन कौन्सिलिंग सेंटर पाचोरा जिल्हा जळगाव पाचोरा प्रतिनिधी अनिल (आबा) येवले

वैचारिक परवड लेखन सौ ललिता ताई पाटील कार्यकर्ते ललिता पाटील संचालिका स्पंदन कौन्सिलिंग सेंटर पाचोरा जिल्हा जळगाव सर्वप्रथम वाचकांना माझा नमस्कार बरेच दिवसापासून अनेक विचार डोक्यात असून देखील काही लिखाण झाले नाही मध्यंतरी मला अनेक मेसेज देखील आले ताई आम्ही लिखाणाच्या प्रतीक्षेत आहोत…. खरंतर सत्य परिस्थिती आणि वास्तविकेत येणारे अनुभव यावर माझे लेखन असते… आजूबाजूची परिस्थिती बघून खरंच वैचारिक घुसमट होते आणि लेखनासाठी विषय कोणता निवडावा याबद्दल द्वंद्व सुरू होते अनेक विषय घोंगावत असतात त्यात दिखाव्याची मैत्री हेवे दावे सामाजिक पत प्रतिष्ठा प्रत्येकाची आपण कसे श्रेष्ठ आहोत हे इतरांना पटवून सांगण्याची धडपड हे सर्व काही अनुभवताना वैचारिक परवडत तर होणारच म्हणून आजच्या लेखनाला मी वैचारिक परवड हेडिंग देणे योग्य मानल … प्रत्येक क्षेत्र हे नीतिमत्ता सोडून वेगळ्या मार्गाला जाताना दिसून येते त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य विचार करणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते परंतु पुढील काही सामाजिक प्रश्नांना दुर्लक्षित करून चालणार नाही मी स्वतः कौन्सलर असल्यामुळे पुढचे संभाव्य धोके लक्षात येतात अगदी दोन ते तीन महिने लग्नाला झाल्यानंतर पुढच्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी जोडप्यांची धाव असते …असे का याचा आपण कुठेतरी विचार करणार आहोत का? त्यावेळेस आपण आपल्या मुला मुलींची लग्न ठरवतो त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे का विचारत नाही की फक्त सामाजिक प्रतिष्ठा राखायची म्हणून दोन कुटुंबांचा बळी दिला द्यावा हे कितपत योग्य…, दोन दिवसांपूर्वीच वटपौर्णिमेचा सण साजरा झाला अगदीच नटून थटून हाच पती जन्मोजन्मी मिळावा यासाठीचे हे व्रत परंतु ह्या व्रताचे पवित्र कुठेतरी हरवल्यासारखे वाटते फक्त सोशल मीडियावर आपण सर्वेकडे दिसावे त्यासाठी केलेला केविलवाना प्रयत्न… संसार टिकवण्यासाठीची जबाबदारी कुणा एकट्याची नाही तर दोघांची समान असते… परंतु यामध्ये दोघांमध्ये असलेला अहंकार, आपण आजच्या सोप्या भाषेत म्हणायचं झालं तरी इगो
खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो आज कालच्या मुली लग्न बंधन किंवा संसार याकडे फक्त एक व्यवहार म्हणून बघायला लागल्या…… मागे मी माझ्या लेखनामध्ये लिहिलं होतं लग्न जमवणं तर अवघड परंतु झालेली लग्न टिकवणे हे देखील सोपे राहिले नाही… हल्ली काही ठिकाणी मुली 35 मध्ये येतात तरीही लग्नाचा विचार करत नाही कारण अपेक्षा… अविवाहित तरुण तरुण यांचे प्रमाण वाढते आहे लग्नासाठी मुलींची संख्या कमी आहे हा आपला भ्रम आहे… मुली खुप आहेत अपेक्षा एवढ्या वाढल्या आहेत त्याअपेक्षा प्रत्येकाच्या पूर्ण होणे शक्य नाही… परंतु हा मॅरेज गॅप समाज व्यवस्थेला न परवडणारा आहे… हल्ली लहान मुला मुलींची संख्या झपाट्याने कमी होत आहे मराठी शाळा ओस पडण्याच्या मार्गावर आहेत.. अनेक ठिकाणी भविष्यात या समस्या गंभीर होत चालत जाणार….. त्यामुळे योग्य दिशेने व्यक्त व्हा मोठे मोठे जाणकार देखील हल्ली आपल्या खोट्या अहंकारा पायी चुकीच्या दिशेने विचार करताना जाणवत आहेत चढाओढ करा नक्कीच करा परंतु भावी पिढीचे भविष्य देखील आपल्याच हाती असते हे नेहमी मी माझ्या लिखाणातून सांगत आले आहे… आपले विचार हे आपल्या कंट्रोलमध्ये असले पाहिजे…. व्यक्ती परत्वे विचार हे बदलत असतात.. वैचारिक समस्या नेहमीच असणार परंतु स्वतःच्या विचारांवर जर आपण अंकुश ठेवलं तर बाहेर कितीही घाण असली तरी आपल्या विचारांना आपणच कुंपण घालू शकतो त्यामुळे विचार हे बांधून न ठेवता कुंपणात का होईना व्यक्त झाले पाहिजे म्हणजे वैचारिक परवड होणार नाही धन्यवाद सौ ललिता पाटील
संचालिका ..स्पंदन कौन्सिलिंग सेंटर पाचोरा जिल्हा जळगाव
