ताज्या बातम्या

वीज कंपनीच्या अधिकाऱ्याकडून महिलेचा विनयभंग एमआयडीसी विश्रामगृह जिल्हा जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस करूनही एससी दलित समाजाच्या महिलेचा विनयभंगाची केस घेतली नाही शेवटी जळगाव पोलीस अधीक्षक जळगाव त्यांच्याकडे तक्रार दाखल


सविस्तर वृत्त असे की दिनांक 17/ 4/ 2024 रोजी सकाळी 7 वाजून 45 च्या सुमारास सामने वाला याने मला बोलावले त्यानंतर मी तिथे पोहोचल्यावर मला चहा तयार करून रेस्ट हाऊस मध्ये घेऊन जा मी चहा घेऊन गेले असता सदर वीज कंपनीचा अधिकारी याने माझा हात धरून लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले त्यामुळे मी घाबरून रूम मधून बाहेर आल्यानंतर येथे सत्तू नावाचा मुलगा याला शोधले असता तो मला तेथे आढळून आला नाही मी रस्त्यावर येऊन कोणीतरी ओळखीचं भेटेल याची वाट पाहिली परंतु कोणीही न आढळून आल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या एका अनोळखी ईसमाला माझ्यावर आप बीती सांगितली त्याने मला सांगितले की इथून जवळच एमआयडीसी पोलीस स्टेशन आहे तेथे तक्रार करा मी एमआयडीसी पोलीस स्टेशनला 8 वाजून 30 वाजेच्या सुमारास पोहचली पोचल्यानंतर ठाणे अंमलदार यांनी माझी सगळी हकीकत ऐकली व मला थोड्या वेळ बसायला सांगितले थोड्या वेळ करता करता दोन-तीन तास बसवून ठेवले त्यानंतर वीज कंपनीच्या अधिकाऱ्याला बोलविले त्याची विचारपूस केली त्यानंतर माझी तक्रार नोंदवली गेली नाही आणि त्या अधिकाऱ्यावर काही एक कार्यवाही झाली नाही म्हणून तक्रारदार महिला यांनी जळगाव पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार नोंद केली असून त्या महिलेची तक्रार एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव यांनी का घेतली नाही लोकशाही सुरू आहे तर फार मोठे आश्चर्य वाटत आहे महिलेला शेवटी जिल्हा अधीक्षक जळगाव यांच्याकडे तक्रार करावी लागली












Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button