बनावट लायसन मध्ये लाखोचा भ्रष्टाचार त्या अगोदर सौरभ शर्मा प्रकरण करोडोचा घोटाळा झाला तरीही महाराष्ट्र परिवहन मंडळ भ्रष्टाचार थांबवण्यात असमर्थ आरटीओ चेक पोस्टवर तर पैशांचा पाऊस पडतो असे कोणी म्हणेल पण अक्षरशा पैशांची ढगफुटी सुरू असते गृह परिवहन विभाग मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे परिवहन कार्यालय जळगाव असे अनेक ठिकाणी जिल्ह्यातील परिवहन खात्याला तक्रार अर्ज करूनही आतापर्यंत कोणत्याही तक्रारीची दखल घेतलेली नाही

बनावट लायसन मध्ये लाखोचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा तसेच आरटीओ चेक पोस्ट त्वरित बंद करण्यात यावे आरटीओ चेक पोस्टवर तर पैशांचा पाऊस पडतो असे कोणी म्हणेल पण अक्षरशा पैशांची ढगफुटी सुरू असते गृह परिवहन विभाग मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे परिवहन कार्यालय जळगाव असे अनेक ठिकाणी जिल्ह्यातील परिवहन खात्याला तक्रार अर्ज करूनही आतापर्यंत कोणत्याही तक्रारीची दखल घेतलेली नाही गुजरात एमपी राज्यांमध्ये महाभ्रष्ट चेक पोस्ट बंद करून टाकली महाराष्ट्रात का होत नाही महाराष्ट्रात एवढा मोठा भ्रष्टाचार होतो परिवहन मंडळ प्रादेशिक परिवहन मंडळ नेमक करते तरी काय?आता सध्या जळगाव येथील परत एक नवीन भ्रष्टाचार समोर आला आहे तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन मंडळाच्या अधिकारी व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी बनावट लायसनचा फंडा करून महाराष्ट्र शासनाला लाखोचा चुना लावला आरटीओ चेकपोस्ट महाराष्ट्राचे सरकार बंद कां करित नाही तीन मुख्यमंत्री महाराष्ट्रात लाभले संविधानाच्या विरोधात कार्यक्रम सुरू असून धुळे जिल्ह्यातील आग्रा – मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील हाडाखेड ( पूर्वी पळासनेर ) आरटीओ चेक पोस्ट वर पैशांचा पाऊस पडतो असे कुणी म्हणेल परंतु ते अर्धसत्य आहे या चेकपोस्ट वर पैशांची अक्षरशः ढगफुटी सुरू असते ही बाब लक्षात घेतली पाहिजे कारण देशभरात आर टीओंची जी काही मोजकी मलईदार चेकपोस्ट आहेत त्यात हाडाखेड चेकपोस्ट वरच्या क्रमांकावर आहे. नवापूरच्या गव्हाली चेकपोस्ट वर काही दिवसांचीच ड्यूटी लावण्यासाठी म्हणून आरटीओ निरिक्षकाकडून तीन तीन लाखांचे रेट वसूल करताना लाच लुचपतवाले वरिष्ठांना रंगेहाथ पकडतात यावरून गव्हालीला दररोज एकेका आरटीओ ची किती पेट्यांची कमाई असेल याची कल्पना येते गव्हालीसारख्या ठिकाणी जर पैशांचा इतका पाऊस पडत असेल तर मग हाडाखेड सारख्या देशातल्या मोठ्या व हेवी चेकपोस्ट वर पावसाची ढगफूटीच होते असेच कुणीही म्हणेल जिल्ह्यात छटाक – छटाक प्रकरणात तोडीपानी करणारे कितीतरी महाभाग आहेत परंतु एक तोड्यापीर हाडाखेडच्या या पैशांच्या ढगफूटी बाबत ओरड करताना दिसत नाही. याचे कारण आरटीओ कडच्या भिकारी डायरी चा हा चमत्कार आहे ही भिकारी डायरी दरमहाच्या पगाराप्रमाणे पुढच्या पुढे पगार करून अनेकांचे तोंड बंद ठेवत असते हा भिकारी डायरी प्रकार मोठा आहे तरी सुद्धा या भिकारी डायरीचे काय घेता यात काही बडेही हात धुवून घेतात हे पळासनेर (हाडाखेड ) चेकपोस्ट पूर्वी प्रचंड गाजले होते यातून नाशिकच्या एका मध्यम महाभागाने पंचवीस वर्षापूर्वी त्या काळात त्याच्या टेबलावर तब्बल दहा पेट्या मागवून तेव्हाचा सर्वात मोठी भिक घेण्याचा विक्रम केला होता तेव्हा हा विक्रम सर्वात मोठा होता तेव्हाच्या दहा पेट्या म्हणजे आजचा एखादा खोका म्हणता येईल असे पेट्या – खोक्यातून सरड्या सारखे रंग बदलणारे सरडे हे देखील आरटीओंच्या भिकारी डायरी’तल्या छूट – पुट भिकाऱ्यां पेक्षा मोठे महाभिकारी असतात ही बाब या प्रकारचे आरटीओ चेक पोस्टच सिद्ध करू शकतात देशात सर्वत्र पैशांची ढगफूटी होणाऱ्या या चेकपोस्टची जादु काय असते हे मध्य प्रदेशातील आरटीओच्या एका साध्या शिपायाने दाखवून दिले आहे सौरभ शर्मा नावाचा हा शिपायी वडिलांच्या जागेवर म.प्र. मध्ये आरटीओत लागला चेकपोस्टवर तैनात झाला तेथील पैशांची ढग फूटी पाहून आवाक् झाला कमाईला सुरवात केली हळू हळू मध्यप्रदेशच्या ४७ पैकी २३ चेकपोस्टचे ठेकेही त्याने घेवून टाकले पैशांचा प्रचंड ओघ पाहता सात वर्षातच व्हिआरएस घेवून तो पूर्णवेळ चेकपोस्ट वरील पैशांची ढगफुटी सामावून घेवू लागला होता मध्यंतरी जंगलात बेवारस कारमधे किलोगणती सोने व कोट्यवधिंची कॅश सापडल्याचे प्रकरण गाजले होते या आरटीओ शिपायाकडे आयटी इडी ने वक्रदृष्टी फिरविली तेव्हा चक्क तिनशे कोटींपेक्षा अधिकचे घबाड यंत्रणांच्या हाती आले तब्बल ५२ किलो सोने २३४ किलो चांदी भोपाळ मध्ये अति अलिशान लक्झरी बंगला इंदोर मध्ये रेडिसन स्टार हॉटेल समोर हॉटेल भोपाळ – इंदोर- नोएडा वगैरे मोठ्मोठ्या शहरात प्रचंड प्रॉपर्टीज कोट्यवधिंच्या खर्चाची शाळा इमारत काय नाही सापडले डोळे विस्फारून जावेत इतकी प्रचंड संपत्ती आरटीओ चा एक साधा चेकपोस्ट शिपाई भ्रष्टाचारातून कमावतो तर आरटीओ इन्सपेक्टर त्याचे वरिष्ठ संचालक परिवहन मंत्रालय परिवहन मंत्री यांची काय चांदी ( की सोने की प्लॅटिनम ) राहात असेल? सामान्य माणूस कल्पनाच करू शकत नाही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री ना. मोहन यादव यांनी मात्र एक काम चांगले केले. राज्यातली ही सर्व महाभ्रष्ट चेकपोस्टच बंद करून टाकली. गुजरातने तर त्याआधी बंद करून टाकली होती महाराष्ट्राला मात्र लालुच आवरत नाही आता सारे डिजिटल झाले आहे ऑनलाईन झाले आहे. भ्रष्ट्राचार कमी करण्यासाठी अशा विभागात मानवी हस्तक्षेप बंद करून – फेसलेस ऑनलाईन कार्यपद्धती अंगिकारली पाहिजे. पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनीही पूर्वीच अशा फेसलेस डिजिटल कार्यपद्धतीची सुचना केली होती महाराष्ट्रात आजही मंत्रालयात जी खाती मलईदार आहेत असे मानले जाते त्यात परिवहन हे वरच्या क्रमांकावर येते यामागचे रहस्य वेगळे सांगावयाची गरज नसावी ही सर्व आरटीओ चेकपोस्ट मानवी हस्तक्षेप शिवाय फेसलेस व डिजिटल करून म. प्र. प्रमाणे बंद करण्याचा निर्णय पुरोगामी – प्रगतीशील – इजऑफ डुइंग बिझनेसचा नारा देणारे महाराष्ट्र सरकार केव्हा घेणार आहे हा सौरभ शर्मा प्रकरणातून उपस्थित झालेला खरा प्रश्न आहे!





